मी अंथरतो अन् पांघरतो,
ती गझल तुम्हाला ऐकवतो.
तुझ्या लोचनी जंगल आहे;
मी वाटच जेथे विस्मरतो.
रेलगाडीसम तू जाशी अन्
पुलापरी मी थरथरतो.
नाराजीचे सूर सभोती-
प्रकाशात मी जेव्हा असतो.
एक हात निखळल्यापासुनी
जास्त वजन मी उचलत असतो.
विसरायाच्या प्रयत्नात मी,
तुझ्याच अगदी निकट असतो.
कोण निभावून नेईल अंतर?
देवदूत मी- खरे सांगतो.
(अनुवाद : सदानंद डबीर)
Saturday, May 10, 2008
मी अंथरतो अन् पांघरतो : दुष्यंतकुमार
| दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा मराठी कवितेत गझल या काव्यप्रकारावर स्वत:ची ठसठशीत नाममुद्रा उमटवली ती सुरेश भटांनी.या अर्थाने मराठी कवितेत त्यांचा ‘रंग’ वेगळा उठून दिसतो. आज गझलच्या रंगात मराठी कविता चांगलीच रंगली असली तरी एक काळ असा होता की गझल ह्या काव्यप्रकाराला मराठीत मान्यता नव्हती.अजूनही अधूनमधून ह्या काव्यप्रकाराला कृत्रिम,कृतक,तंत्रशरण अशी विशेषणे लावल्या जातात.पण त्याची तमा न बाळगता अत्यंत निष्ठेने सुरेश भटांनी गझला लिहिल्या. मराठीत नव्याने लिहू लागलेल्या पिढीच्या हवाली एक सशक्त आकृतीबंध केला | भीड़ लोगों की हटा दो कि मैं ज़िंदा हूँ अभी `ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो`जगजितसिंग यांच्या रेशमी स्वरात हे गीत आपण खुपदा ऐकले. ‘रम्य ते बालपण’ आठवत कितीतरी वेळा गुणगुणले.अशी गाणी सकाळी सकाळी हलक्याशा लिपस्टिकसारखी एकदा ओठावर चढली की दिवसभर ओठांवर असतात.सूर्य मावळला तरी ती मावळायला तयार होत नाहीत.एखाद्या कलाकृतीचं नशीब असं असतं की ती कलावंताच्या नावाहून जास्त मशहूर होते.वरील गीताचंही तसंच झालं. कवीच्या नावाहून जास्त रसिकप्रियता गीताच्या पदरात पडली. आणि मग एक दिवस कवीचं नाव अचानक पुढं आलं ते थेट बातमीत-‘कागज की कश्ती लिखनेवाले शायर सुदर्शन फा़किर नही रहे।’ती तारीख होती : १९ फेब्रुवारी, २००८. |
वृत्तांची विविधता :
हिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :
उर्दू गझलांची वृत्ते (बहर) :
ग़ज़ल-लिखना सीखिए :
गझलसंबंधी लेख :
- होगा कोई ऐसा भी कि ग़ालिब को न जाने
- ग़ज़ल ग़ालिब की होती थी मगर...
- ग़ालिब और इज़ारबंद की गाँठें
- एक ग़ालिब और एक रघुपति सहाय फ़िराक़
- ग़ज़ल का सफ़र और फ़िराक़ एक मंज़िल
- ग़ुस्से और नाराज़गी की आवाज़ थे दुष्यंत
- शेर पढ़ने का शौक और भूखे रहने के दिन
- कैफ़ी आज़मी नहीं रहे
- मशहूर शायर का सामान सड़क पर
- शेर लिख कर सुलह की एक बाग़ी बेटे ने
- कभी धूप कभी छाँव के दिन
- एक मुलाक़ात: जावेद अख़्तर के साथ
- बात जो दिल से निकलती है असर रखती है’
- शायरी का अनुवाद कितना जायज़?
- 'हर फ़ासला झूठा है, हर दूरी सियासत है'
- भारत की शायरी बनाम पाकिस्तान की शायरी
- रुबाइयाँ: उमर ख़ैयाम से बच्चन तक


