डॉ.गणेश गायकवाड 'आगाज' लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डॉ.गणेश गायकवाड 'आगाज' लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

४ सप्टेंबर, २०११

'दुख ने मेरे घर का रस्ता देख लिया है' : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'


प्रिय रसिक,

'बहुत कठीण हुआ इन दिनो गझल कहना
लहु में डुबे हुये चांदको कंवल कहना।।
बहुतसे लोग है दुनिया में जिनका कोई नही
उन्ही के वास्ते भी तुम कोई गझल कहना।।


अशा लोकांसाठी गझल लिहणे हे खर्‍या शायराचे कर्तव्य! आतापर्यंत आपण शायरांच्या गझल वाचल्यात; परंतु आज आपण एका पाकिस्तानी स्त्री (शायरा) गझलकाराला भेटणार आहोत. जिची गझल संपूर्ण स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करणारी गझल आहे. तिचे नाव होते परवीन शाकीर. आज भारत पाकिस्तानमध्ये स्त्री शायरांची फार मोठी फेहरीस्त आहे. नुजहत अन्जुम, शमीना अदीब, अन्जुम रहबर, लात हया, प्रीती वाजपायी ह्या सर्व शायरा जिला आपला आदर्श मानतात अशी परवीन शाकीर. तिचा जन्म २४ नोव्हेंबर १९४२ ला कराची येथे झाला. परवीन पुढे एम.ए. (इंग्रजी वाड्मय) झाली. अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. केल्यावर परवीन इस्लामाबाद येथे कस्टम खात्यामध्ये कलेक्टर म्हणून जॉईन झाली. गझल लेखन कॉलेज लाईफपासूनच सुरू होते. तिचा पहिला कलाम 'खुशबु' १९७५ मध्ये प्रकाशित झाला आणि संपूर्ण उर्दू दुनिया अचंबित झाली. हुस्न, इश्क, शबाब यातच गुरफटणार्‍या उर्दू शायरीला परवीनच्या गझलांची नजाकत वेगळीच वाटली. बकौल परवीन-

शौकेरक्स (नृत्याची इच्छा) से जबतक उंगलिया नही खुलती
पांवसे हवाओंकी बेडिया नही खुलती
हुस्नके समझने को इक उम्र चाहिये जाना
दो घडी की चाहत में लडकिया नही खुलती।।
माँ से क्या कहेगी दु:ख हिजका (जुदाई) की खुद पर भी
इतनी छोटी उम्रो में भी बच्चीया नही खुलती।।


स्त्री जीवनाच्या प्रत्येक वळणावर परवीनची शायरी साथ देणारी आहे. स्त्रीचं तारुण्यात पदार्पण होणे, विवाह होणेपासून आई होण्यापर्यंतची दास्तान परवीनने आपल्या गझलांमध्ये मांडली.
प्रेमभावना परवीनने एवढय़ा हळुवार मांडल्या

धनक धनक वो मेरे कर देगा
(इंद्र धनुच्या)
वो लमस (स्पर्श) मेरे बदन को गुलाब कर देगा।।
मै सच कहूँगी मगर फिर भी हार जाउँगी
वो झुठ बोलेगा और लाजवाब कर देगा।।


जीवनात विरह, वेदना, पिडा यांचा सुरेख संगम म्हणजे परवीनची शायरी

बादबा खुलने से पहले का इशारा देखना
मै समन्दर देखती हँू तुम किनारा देखना।।
यु बिछडना भी बहत आसा न था उससे मगर
जाते जाते उसका मुडकर वो दुबारा देखना।।


परवीनच्या नंतर आलेल्या पुस्तकांनी उर्दू जगतामध्ये फार मोठी क्रांती केली. सदबर्ग (१९८0), खुदकलाम (१९९0), इन्कार (१९९0), माहेतमाम (पूर्ण चंद्र) १९९१ ही तिची गझल व कवितांची गाजलेली पुस्तके. यासाठी साहित्य क्षेत्रातील पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्राईड ऑफ परफॉर्मन्स हा पुरस्कार मिळाला. जीवनाच्या प्रत्येक अनुभवाला परवीन शब्दबद्ध करायची.

खुली आंख मे सपना झाकता है
वो सोया है के कुछ कुछ जागता है।।
तेरी चाहत के भीगे जंगल में
मेरा मन मोर बनके नाचता है।।


अशी सहज सुलभ स्त्री भावना व्यक्त करणारी परवीन पुढे म्हणते-

बारिश हुयी तो फुलो के तन चाक हो गये
मौसम के हाथ भीग केसफ्फाक हो गये।।
जुगनू को दिन के वक्त परखने की जिद करे
बच्चे हमारे दौरके चालाक हो गये।।


पाकिस्तानच्या कस्टम खात्यामध्ये कलेक्टरच्या पदावर नोकरीला असणारी परवीन खरेतर सर्व सुखे, ऐश्‍वर्य पायावर लोळण घेत असताना समकालीन शायरांना प्रश्न पडायचा परवीनला काय दु:ख आहे? एवढी गमगीन गझल का लिहते याचे उत्तर खरे तर तिच्या कौटुंबिक आयुष्यात एकटेपणामध्ये असावे. कारण एक मुलगा झाल्यावर केवळ आपल्यापेक्षा परवीन जास्त लोकप्रिय आहे, या अभिमानी पुरुषी स्वभावामुळे तिच्या डॉक्टर नवर्‍याने तिला तलाक दिला आणि परवीन एकटी झाली. ही 'तनहाई' गझल बनून आली.

'शायद उसने मुझको तनहा देख लिया है
दु:ख ने मेरे घर का रस्ता देख लिया है।।
आप अपने से आंख चुनाये फिरती हूँ
आईने में किसका चेहरा देख लिया है।।


आणि शायर एकटा असला तरी मनाने तो कधीच एकटा नसतो. जगाचे दु:ख, लोकांच्या समस्या सातत्याने तो गझलमध्ये मांडत असतो. परवीन एका ठिकाणी म्हणते.

तेरा घर मेरा जंगल भीगता है साथ साथ
ऐसी बरसाते की बादल भीगता है साथ साथ।।
बारिश में भी कितना तनहा मेरा किसान
जिस्म और इकलौता कम्बल भीगता है साथ साथ


प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे सर्मपण स्त्रीचे हे दु:ख तिने गझलमध्ये मांडले.
कमाले जब्त (संयम)को खुद भी तो आज माऊंगी
मै अपने हाथ से उसकी दुल्हन सजाऊंगी
वो क्या गया की रफाकत (दोस्ती) के सारे लुत्फ गये
मै किससे रुठ सकूंगी, किसे मनाऊंगी
परवीन एका कलेक्टरच्या पदावर होती. एक सुंदर स्त्री, एक 'कमाल की शायरा' एक तर पाकिस्तानातसारख्या देशात स्त्री होणं हाच एक अभिशाप. त्यातही असं दृष्ट लागल्यासारखं कर्तृत्व, अशा गझला त्यामुळे पाकिस्तानचा प्रख्यात उर्दू समीक्षक अहमद नदीम कासमीने संशयाचा तीर सोडला.

२१ ऑगस्ट, २०११

आज तुम याद बेहिसाब आए : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'


प्रिय रसिक,
उर्दू काव्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा उर्दू गझलमध्ये मीर, गालीब, दाग इकबाल, जिगर यांच्यासोबत आणखी एक नाव आदराने घेतल्या जाते ते म्हणजे प्रख्यात शायर प्रगतीशील आंदोलनाचा प्रवर्तक फैज अहमद फैज.
फैज शायरी गझल लिहण्याविषयी अतिशय संवेदनशील होता. एका ठिकाणी तो म्हणतो 'शेर लिखना जुर्म न सही लेकीन बे वजह शेर लिखते रहना ऐसी अक्लमंदी भी नही है'।
फैजच्या शायरी/गझल नज्मवर त्याने अनुभवलेल्या जीवनातील प्रसंगाचा फार मोठा प्रभाव आहे. फैज अहमद फैजचा जन्म जिल्हा सियालकोट येथे झाला. १९३४ ला शिक्षण पूर्ण झाल्यावर १९३५ ला अमृतसर येथे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर लाहौरला १९४0 मध्ये बदलून गेले. त्या काळात गझल लिहणे सुरू होते. १९४१ मध्ये मिस एलिस जार्ज या इंग्रजी महिलेशी प्रेमविवाह करणारा फैज म्हणतो,
दोनो जहाँन तेरी मुहब्बत में हारके
वो जा रहा है कोई शबे गम गुजारके।
वीरा है मैकदा, खुमो सागर उदास है
तुम क्या गये की रुठ गये दिन बहारके।।
दुनिया ने तेरी याद से बेगाना कर दिया
तुझसे भी दिल फरेब है गम रोजगारके ।।
एकेकाळी प्रेयसी, तिचे सौंदर्य, डोळे यात भान हरवून जाणारा शायर फैजच्या जीवनात कलाटणी मिळाली. १९४२ मध्ये दुसरे विश्‍व युद्ध सुरू झाले. फैज शिक्षण कार्य सोडून सैन्यात भरती झाले आणि १९४३ मध्ये कर्नल होऊन दिल्ली येथे आले. १९४७ मध्ये भारत/पाकिस्तान हे दोन तुकडे झाले आणि सैन्यात असलेले फैज पाकिस्तानी सैन्यासोबत लाहौर येथे आले. तेथे फैजने नोकरीचा राजीनामा दिला. परंतु आपल्या प्रगतीशील विचारांचा प्रभाव म्हणा की काय, पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री लियाकत अलिखान यांच्या सरकारला धोका निर्माण करण्याचा, षडयंत्राचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला व १९५१ मध्ये ४ वष्रे १ महिना कैद झाली.
मित्र, पत्नी, मुले यांना भेटावयाची मनाई आणि तुरुंगात पेन व कागद वापरण्यावर बंदी. परंतु फैजमधला शायर जिवंत होता. त्याने तुरुंगाच्या भिंतीवर कोळशाच्या साह्याने शेर लिहणे सुरू ठेवले.
मता ए लोहो कलम छिन गई तो क्या गम है।
कि खूने दिल में डुबोली है उँगलीया मैने
आणि मग रोमांसवाद, स्वप्नाळूपणा यातून पूर्णपणे मुक्त होऊन फैजची शायरी बहरली आणि तो आपल्या प्रेयसीला म्हणाला,
अब भी दिलकश है तेरा हुस्न मगर क्या कीजे
और भी गम है जमाने में मुहब्बत के सिवा
मुझसे पहली सी मुहब्बत मेरे महेबुब न मांग
राहते और भी है वस्ल की राहत के सिवा।।
तुरुंगात फैजने लिहिलेल्या अधिकतर कविता 'दस्ते सबा' व 'जिंदानामा' या दोन काव्यसंग्रहात समाविष्ट आहेत. १९५९ ला फैज तुरुंगातून सुटले आणि साहित्यिक कार्यामध्ये स्वत:ला वाहून घेतले. उर्दूची प्रसिद्ध साहित्यिक पत्रिका अदबे लतीफ पाकिस्तान टाईम व इमरोज या सर्व पत्रिकांचे ते प्रधान संपादक होते. १९६२ मध्ये फैज यांना साहित्यिक सेवेसाठी लेनिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्यिक, शायर, कवी कसा असते, याचा एक परिपाठ त्यांनी घालून दिलेला. आपल्या एका कवितेत फैज म्हणतात,
हरेक दौर मे हम, हर जमाने में हम
हर पीते रहे गीत गाते रहे।।
जान देते रहे जिन्दगी के लिये
दिन ओ दुनिया की दौलत लुटाते रहे
जो भी रस्ता चुना उसपे चलते रहे।
जिन पे आँसू बहाने को कोई न था
अपनी आँख उनके गम में बरसती रही
लोग सुनते रहे साज ए दिल की सदा
अपनी गजल सलाखो से छनती रहे
सहल यूँ राह जिन्दगी की है
हर कदम हमने आशिकी की है
हमने दिलमे सजा लिये गुलशन
जब बहारोने बेरूखी की है।।
फैजची शायरी कष्टकरी समाजाची होती. मजदूर, शेतकरी यांच्या कार्यक्रमांना त्यांना आवर्जून बोलावल्या जायचे. उर्दू जगताचा हा आधुनिकता वादाचा कट्टर पुरस्कर्ता शायर १८ नोव्हेंबर १९८५ लाहौर येथे पैगंबरवासी झाला आणि शेवटी त्याची आठवण होतांना त्यांचाच शेर आठवतो.
कर रहा था गमे जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये।
मो. ९८५0१३५४0५


१४ ऑगस्ट, २०११

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'



प्रिय रसिक,
उद्या भारतीय स्वातंत्र्याचा ६४ वा वर्धापन दिन. या शुभप्रसंगाच्या 'लोकमत'च्या तमाम वाचकांना हार्दिक शुभेच्छा. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पारतंत्र्याच्या बेड्या गळून पडल्या. १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांनी ब्रिटीश साम्राज्याला जबरदस्त धक्का दिला होता. त्या उठावापासून ९0 वर्षेपर्यंत चाललेला स्वातंत्र्याचा लढा हिंसक आंदोलनापासून अहिंसक सत्याग्रहापर्यंत विविध वळणांवर भारतीय जनतेने अनुभवला. संपूर्ण भारत एक झालेला सार्‍या जगाने पाहिला. या स्वातंत्र्यसंग्रामाचे आणखी एक आगळे वेगळे वैशिष्ट्ये हे होते की, भारतीय जनमानसाच्या भावना चेतविण्याचे काम त्या काळात 'उर्दू गझल'नेही केले. 'इन्कलाब जिन्दाबाद' हा नारा उर्दूने आम्हाला दिला.
उर्दू गझल जी कधी लखनौच्या नवाबांच्या दरबारात संगीताच्या ठेक्यावर ताल धरणारी व नृत्य सादर करणारी उमराव जान 'अदा' व मुन्नीबाई'हिजाब' होती. ती गझल जेव्हा क्रांतिकारकांच्या हृदयातून लेखनीतून बाहेर पडली. तेव्हा ती रजिया सुलतानची तलवार व राणी लक्ष्मीबाईचा स्वाभिमानाचा पेहराव लेऊन जनमानसात अवतीर्ण झाली. आपल्या मादक व सुमधूर आवाजाने विलासी राजांना व नवाबांना खूश करण्याचा प्रयत्न करणारी गझल जेव्हा क्रांतिकारकांच्या शब्दांत तावून सुलाखून निघाली, तेव्हा ती असा एक 'तीर' बनून आली. जिने ब्रिटीश साम्राज्याचे कठोर काळीज छिन्नविछिन्न करून टाकले.
अशा क्रांतिकारकांपैकीच एक होते रामप्रसाद बिस्मील. ९ ऑगस्ट १९२५ मध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला आणि इतर क्रांतिकारकांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी पैसा उभा करण्यासाठी काकोरी जवळ रेल्वे गाडी थांबवून सरकारी खजिना लुटला. त्यातील रामप्रसाद बिस्मिल हा २६ वर्षाचा तरुण उर्दूचा मान्यवर शायर व अचाट प्रतिभेचा हिन्दी कवी होता. साक्ष द्यायला त्यांची ही गझल पुरेसी आहे.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बाजू ऐ कातिल में है।।
ए शहिदे मुल्क व मिल्लत में तरे उपर निसार
अब तेरी हिम्मत के चर्चे गैर की महफिल में है।।
जिस्म वो क्या जिस्म है, जिसमें न हो जोशे जुनून
क्या लडे तूफान से वो कश्ती जो साहिल में है।।
वक्त आने पे बता देंगे तुझे ए आसमा
हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है।

तुरुंगात डांबल्यावर रामप्रसाद बिस्मिल यांच्यावर ब्रिटीशांनी अमानुष अत्याचार केले. त्या वेळेस त्यांना ते सहन करण्याचे धैर्य त्यांच्या गझलनेच दिले. १९ डिसेंबर १९२७ ला या क्रांतिकारकाला गोरखपूरच्या तुरुगांत फाशी देण्यात आली. १८ तारखेला तुरुगांत जेव्हा त्यांना त्यांची आई भेटावयास आली. आईला भेटताना त्यांच्या डोळय़ात अo्रू आले. आई धिराची देवता होती.
ती रामप्रसादला म्हणाली, 'बेटा राम, हरिश्‍चंद्र, दधिची या तुझ्या पूर्वजांप्रमाणे तू सुद्धा वीरत्व, धर्म व देश यासाठी प्राण दे. चिंता आणि पश्‍चाताप करण्याची अजिबात गरज नाही', 'पण आई आगीजवळ ठेवलेले तूप विरघळतेच ना. तुझे अन् माझे नातेही तसेच आहे. तू जवळ येताच माझ्या डोळय़ात अo्रू दाटून आले अन्यथा मी फार आनंदी आहे' फाशीसाठी घेऊन जात असतानाही त्यांनी मोठय़ाने वंदे मातरम् म्हटले आणि ही गझल म्हटली.
मालिक तेरे रजा रहे और तू ही तू रहे
बाकी मै रहू न मेरी आरजू रहे ।।
जब तक कि तन में जान रगों में लहू रहे
तेराही जिक्रे यार तेरी जुस्तजू रहे ।।

फाशीच्या तख्तावर उभे राहून ते म्हणाले
"I wish the downfall of the British Empire"
नंतर हा शेर म्हटला.
'अब न अहले वल वले है और न अरमानो की भीड
एक मिट जाने की हसरत अब दिले बिस्मिल में है।

म्हणजे मनामध्ये आता कसलाच कल्लोळ नाही. इच्छा, न आकांक्षा आता फक्त हृदयात केवळ एकच आस आहे, प्राण त्यागाची.पत्थराच्याही काळजाला पाझर फोडणारे क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यासाठीचे हे बलिदान ऐकून डोळे पाणावतात. पुढे आपण स्वतंत्र झालो. परंतु ज्या उदात्त ध्येयासाठी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले गेले. ते पहिल्या पाच-दहा वर्षातच धुळीस मिळताना दिसले. सृजनकार साहित्यकारांचा भ्रमनिरास झाला. प्रगतिशील आंदोलनाचा उदय हा त्याचाच परिपाक होता. त्या प्रगतिशील आंदोलनाचे तीन महत्त्वाचे अध्वयरू होते. अली सरकार जाफरी, जनिसार अख्तर आणि साहिर लुधयानवी या तिघांनी शोषितांचा, वंचितांच्या पीडितांच्या भावना बोलून दाखवल्या.
कविता, गझल, रुबाई प्रत्येक शेरामध्ये त्यांनी हे व्यक्त केले.
अली सरदार जाफरी हे सर्वांत ज्येष्ठ प्रगतिशील शायर, स्वातंत्र्यानंतरचे उद्विग्न करणारे वातावरण बघून त्यांनी लिहिले.
मेरे हाथ से मेरा कलम छीनलो
और मुझे एक बन्दूक देदो
मैं तुम्हारी सफो में तुम्हारी तरह
अपने दुश्मन से लडने चलूँगा ।

स्वातंत्र्य मिळाले, पण कुणाला, कशासाठी. त्यांची ही कविता आपणास विचार करावयास लावते.
कौन आजाद हुआ?
किसके माथे से गुलामी की सिहायी छुटी?
मेरे सीने में अब भी दर्द है महकूमीा

७ ऑगस्ट, २०११

सारे जहाँ से अच्छा हिंन्दोस्था हमारा : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'















प्रिय रसिक,

'हर हाल में खुश रहने की आदत दे इलाही
नादान हूँ मुझको, नसीहत दे इलाही
इन्सान को इन्सान बनाने मे लगा हूँ
ये काम है मुश्कील मुझे हिम्मत दे इलाही।।

अशा प्रकारचे, माणसाला माणूस बनविण्याचे कठीण काम करणारा एक क्रांतिकारी शायर भारतात होऊन गेला. त्याला उर्दू जगत अल्लामा इकबाल या नावाने ओळखते. डॉ.अल्लामा मुहम्मद इक्बाल यांना शायर-ए-मशारिक पूर्व देशाचा शायर असेही म्हटले जाते.
इकबाल यांचा जन्म १/११/१८७७ मध्ये सियालकोट (पाकिस्तान)मध्ये झाला. त्यांचे पूर्वज काश्मिरी ब्राह्मण होते आणि ३00 वर्षापूर्वी मुसलमान झाले होते. सियालकोट येथे बी.ए.तत्वज्ञानाची शिक्षा प्राप्त केली आणि इक्बाल त्याच काळात नज्म व गझल लिहावयास लागले. वयाच्या २३ व्या वर्षी लाहौर येथील मुशायर्‍यात एक गझल त्यांनी सादर केली. तिचा शेर होता.
'मोती समझ के शाने करी मी ने चून लिये
कतरे जो थे मिरे अर्के इनफआल के।।

म्हणजे पश्‍चातापदग्ध झाल्यावर माझ्या कपाळावरून टपटप जमिनीवर पडणारे घामाचे थेंब प्रत्यक्ष परमेश्‍वराने मोती समजून ओंजळीत भरून घेतले. त्या मुशायर्‍यात त्या वेळचे प्रख्यात उर्दू शायर मिर्झा अरशद गोरगानी उपस्थित होते. हा शेर ऐकून ते म्हणाले 'सुभान अल्ला, साहबजादे इस उम्र मे ये शेर!' पुढे इक्बालची शायरी बहरत गेली. इक्बाल आपल्या काळातील सर्वात 'जहीन' (बुध्दिमान) शायर होते. त्यांनी लंडन येथील कॅमब्रीज युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञानात पीएचडी केली. भारतात परत आल्यावर म्हैसूर व हैद्राबाद येथील विद्यापीठात लेक्चरर म्हणून नियुक्त झाले. अल्लामा इक्बाल यांनी प्रचंड लिखाण केले. मानवी जीवनाला उंचीवर नेणारा, मानवी अस्मितेवर त्यांचा हा अप्रतिम शेर-
'खुदी कर बुलन्द इतना के हर तहरीर से पहले
खुदा खुद बन्दे से पुछे, बता तेरी रजा क्या है?

हे माणसा स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:ला एवढय़ा उंचीवर ने की प्रत्यक्ष परमेश्‍वराने तुला विचारावे- सांग तुझी इच्छा काय आहे. तुझ्या नशिबात काय लिहू? बांगेदिरा, बाल ए जिब्रील, जबॅ कलीम ही त्यांची काही उर्दू पुस्तके आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे हे वैशिष्ट्य़ म्हणावे लागेल. ज्याने रघुपती सहाय फिराकसारखा हिंदू शायर उर्दूला दिला. ज्याने मुहम्मद पैगंबरावर स्तुतीपर काव्य लिहिले तर डॉ.इक्बाल यांची 'रामा'वरील ही कविता सुप्रसिद्ध आहे.
लबरेज है शराबे हकीकतसे जाम ए हिन्द
सब फलसफी है खित्त-ए-मगरिब के राम ए-हिन्द

म्हणजे हिन्दुस्थानाच्या जीवन तत्वज्ञानाचा हा प्याला या शाश्‍वत सत्याने भरलेला आहे की, पश्‍चिमेला जीवन कसे जगावे, याचा पाठ शिकविण्यासाठी हिन्दुस्थानचा 'रामच' पुरेसा आहे.
'है राम के वजूद पे हिन्दोस्था को नाज
अहले नजर समझते है उसको इमाम-ए-हिन्द'

रामच्या जीवनशैलीवर आम्हा भारतीयांना गर्व आहे. राम आमच्या जीवनाचे नेतृत्व करणारा आमचा नेता आहे.
डॉ.अल्लामा इक्बाल यांनी फक्त एकच गीत लिहिले असते तरी भारतीय समाजमनात व विश्‍वात ते अजरामर झाले असते. ते गीत म्हणजे.
'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्था हमारा
हम बुलबुले है उसकी, ये गुलसिता हमारा।।
मजहब नही सिखाता आपस में बैर रखना
हिन्दी है हम वतन है हिन्दोस्था हमारा।।
युनान वो मिस्त्र वो रोम सब मिट गये जहाँसे
अबतक मगर बाकी है, नामो निशा हमारा।।

आपण प्रगतिशील शायरीच्या आंदोलनाचा जेव्हा विचार करतो तेव्हा फैज अहमद फैज, अली सरदार जाफरी, कैफी आजमी, मजरूह यांची नावे डोळ्यांसमोर येतात. परंतु त्यांच्या आधी त्याची मुहूर्तमेढ कुणी रोवली असेल तर डॉ.इक्बाल यांनी. त्यांची ही कविता बघा.
नया शिवाला (नवी शिवमंदिर)
सच कहु तो ऐ ब्रहमन गर तु बुरा न माने
तेरे सनम कदे के बूत हो गये पुराने

'हे ब्राम्हणा, तुला राग येणार नसेल तर खरे सांगू तू ज्या मंदिरात रोज पूजा करतो तेथील मूर्त्या आता जुन्या झाल्या आहेत.
'पत्थर की मूरतो में समझा है तु खुदा है
खाके वतन का मुझको हर र्जरा देवता है।।
सुनी पडी हुयी है मुद्दत से दिल की बस्ती
आ एक नया शिवाला इस देश मे बना दे।।
दुनिया के तीरथ से उंचा हो अपना तीरथ
दामने आसमॉ से इसका कलश मिलादे।।
हर सुबह उढके गाये मंतर वे मीठे मीठे
सारे पुजारीयों को मय प्रीत की पिला दे।।

डॉ.इक्बाल एक द्रष्टा, दूरदृष्टी असणारा बुध्दिमान शायर म्हणून ओळखला जातो. अखंड भारताचा पुरस्कार करणारे इक्बाल यांनी जेव्हा बॅरिस्टर जीनांचा व्दिराष्ट्रवादाचा सिध्दांत ऐकला त्यावेळी ते निराश झाले. त्या काळात जे वातावरण सुरू झाले, हिंदू मुस्लीम विभागल्या गेले. त्या वेळेस त्यांनी ज्या ओळी लिहिल्या त्या आजही प्रासंगिक वाटतात-
वतन की फिक्र कर नादा मुसीबत आनेवाली
तेरी बर्बादीके मशविरे है आसमानोमे
न समझोगे तो मिट जाओगे ए हिन्दोस्थावालों
तुम्हारी दास्ता तक न होगी दास्तानोमें।।

आज घोटाळ्याच्या, अराजकतेच्या, अन्यायाच्या वातावरणात आपण अंतर्मुख होऊन विचार करायला हवा अशा ह्या ओळी आहेत.


३ ऑगस्ट, २०११

पुछते है वो गालिब कौन है? : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'

मैला तन तो धोया जाये, मैले मन को धोए कौन?
हँसता है जो सबके दु:खमे, उसके दु:खमे रोए कौन?
नरम मुलायम है बिस्तर पर नींद जरा भी आयेना
पत्थर को सिर्‍हाने लेकर, गहरी नींद मे सोए कौन?
सब मुझको अपने लगते है, सब मुझको अच्छे लगते है
मै भी सोचू मेरी नींद में ऐसे सपने बोए कौन?
ही दुसर्‍याचे दु:ख आपले समजून, तिला आपला शब्द देण्याची भावना - ही परपीडेची अनुभूती चांगला शायर, कवी होण्याची पहिली खूणगाठ आणि चांगला माणूस होण्याचीसुद्धा. आज आपण चर्चा करणार आहोत उर्दूमधील अशाच परदु:खाला आपले समजून त्याला शब्द देणार्‍या उर्दूमधील सर्वकालिक महान शायराविषयी. ज्याला उर्दू दुनिया 'गालिब' या नावाने ओळखते. 'गालिब'चे पूर्ण नाव मिर्झा असदुलाखॉं गालिब. 'गालिब' हा त्याचा तखलुस टोपणनाव म्हणजे 'विजेता'. आपल्या शायरीने सर्वांचे हृदय, अगदी वयाच्या २५ व्या वर्षीच जिंकणार्‍या या शायराचा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दु:खाशी, दारिद्रय़ाशी संघर्ष आयुष्यभर सुरू होता.

'पुछते है वो गालिब कौन है?
कोई बतलाये के हम बतलाये क्या?'

इतका स्वत:विषयीचा सार्थ अभिमान बाळगणारा शायर गालिबने उर्दू शायरीला 'मीरच्या' 'हुस्न इश्क'च्या प्रभावातून बाहेर काढले. जीवनाचे तत्त्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेत गालिबने जगापुढे मांडले. गालिब फार मोठा तत्त्ववेत्ता नसला, तरी तो एक सजग माणूस होता. जीवनातील घडणार्‍या घटनांना केवळ मूकदर्शक बनून न पाहता त्यांना आपल्या भाषेत त्याने व्यक्त केले.


कोई उम्मीद बर नही आती
कोई सुरत नजर नही आती।।
मौत का एकदिन मुअय्यन१ है

नींद क्यू रातभर नही आती।।
आगे आती थी हाले दिलपे हंसी
अब किसी बातपर नही आती।।
काबा किस मुँहसे जाओंगे गालिब
शर्म तुमको मगर नही आती।।
(१-नक्की)
गालिबचे पूर्ण आयुष्य क्रांतिकारी विचारांचे. तो निधर्मी वृत्तीचा होता. पूजा, कर्मकांड, प्रार्थना, नमाज यावर त्याचा विश्‍वास नव्हता आणि म्हणूनच तो कदाचित म्हणत असावा.
'काबा किस मुँह से जाओंगे गालिब?'
गालिबच्या कर्जबाजारीपणामुळे दिल्लीच्या एका पडक्या कोठीत गालिबचे वास्तव्य. त्याचे वर्णन वाचताना जाणवते. सायंकाळची वेळ. सूर्य अस्ताला गेला आणि गझलेच्या या सूर्याचा उदय झाला. अंधार हळूहळू या छोट्याशा घरात आपले हातपाय पसरवित आहे आणि एक छोटीशी मेणबत्ती आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने त्या अंधाराचा मुकाबला करीत आहे. मध्येच बकर्‍यांचा ओरडण्याचा आवाज येतो आहे आणि त्या सोबतच येतो आवाज- वाह वाहचा- गझल सुरू आहे.
'हरेक बात पे कहते हो तुम, के तु क्या है
तुम्ही कहो कि ये अन्दाजे गुफ्तगू क्या है?
रंगोमें दोडते फिरने के हम नही कायल
जब आँखही से न टपके, तो फिर लहू क्या है?'

माझ्याशी प्रत्येक वेळेस बोलताना तू म्हणतोस तू काय आहेस? तुझी बिशाद काय? मित्रा मला सांग की संवाद साधण्याची ही कुठली तर्‍हा आहे? दुसरा शेर गालिबचे स्वभाव वैशिष्ट्ये सांगणारा आहे. गालिबच्या काळात ब्रिटीशांची जुलमी राजवट सुरू झाली होती आणि त्या काळातच गालिब लिहितो 'केवळ धमण्यातून जे वाहतं त्याला आम्ही रक्त म्हणत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी जर हे रक्त तुमच्या डोळ्यातून अंगार म्हणून बरसणार नसेल त्याला रक्त का म्हणावं?
गालिब त्याच्या शायरीमुळे अल्पावधीत संपूर्ण उर्दू विश्‍वामध्ये प्रसिद्ध झाला. परंतु येथे नमूद करण्यासारखे आहे की, त्याच्या एकूणच उर्दू गझल २३५ च्या आसपास असतील. त्या गझलच्या लोकप्रियतेवरच गालिब गझल सम्राट झाले. गालिबच्या गझलांचा प्रवास जीवनाच्या अखेरपर्यंत सुरूच होता. त्यासोबतच सुरू होता त्या परिस्थितीशी संघर्ष तो म्हणतो.

इब्ने मरियम हुआ करे कोई
मेरे दुख की दवा करे कोई।।

येशू ख्रिस्ताने ज्याला रोगमुक्त करायचे ते खुशाल करावे परंतु माझा रोग जो कुणी दूर करेल तोच माझ्यासाठी o्रेष्ठ आहे.

न सुनो गर बुरा कहे कोई
न करो गर बुरा करे कोई।।
रोकलो गर गलत चले कोई
बख्श तो गर खता करे कोई।।
जीवनाचे तत्त्वज्ञान अशा सोप्या भाषेत मांडणारा गालिब म्हणून आपल्या समकालीन शायर दाग, मोमिन, जॉक यांच्या तुलनेत वेगळा ठरला आणि त्याची शायरी लोकांना खूप आवडली. हुस्न, इश्क या पेक्षाही गालिबने उत्कटता, मानवी नाते संबंध, मानवी स्वार्थ, दु:ख, नैराश्य यांनाच गझलेचे विषय केले. सर्व असूनही मानवी जीव अतृप्त कसे यावर त्याचे हे अप्रतिम शेर.
'हजारो रब्बाहिशें ऐसी की हर रब्याहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकीन फिर भी कम निकले।।
मुहब्बत मे नही है फर्क जीने और मरने का

उसीको देखकर जीते है जिस काफिर पे दम निकले।।
कहॉ मयखाने का दरवाजा गालिब और कहाँ वाईज
पर इतना जानते है, कल वो आता था की हम निकले।।

३१ जुलै, २०११

दो गज जमीन भी न मिली कू -ए-यार मे : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'


प्रिय रसिक

तुम्हारा जिक्र गझल है, तुम्हारी बात गझल
हमारे साथ हो तुम तो, हमारे साथ गझल।।
तुम्हारी याद का तकीया सिरहाने रहता है,
हमारे ख्वाब में रहती है, सारी रात गझल।।

ज्यांच्या स्वप्नामध्ये गझल असते, ज्यांना आपल्या कलेशिवाय काही सुचत नाही, कसे कवी शायर कलावंत म्हटले की, आपल्यासमोर प्रतिमा उभी राहते कुण्यातरी कलंदर व्यक्तिमत्वाची ज्याला आपली, जगाची, नातलगांची पर्वा नाही. फक्त गझल, गझल आणि गझल. परंतु उर्दूमधील एखादा जगद् विख्यात शायर मुघल साम्राज्याचा बादशाह असू शकतो, ही गोष्ट अविश्‍वसनीय वाटत असली तरी ती सत्य आहे.
मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह 'आखरी मुघल' बहादूरशाह जफर हा कलाप्रेमी, विद्वान, रसिक, गुणीजणांचा चाहता, उत्कृष्ट तलवारपटू होता. परंतु तितकाच हळवा, भावनाप्रधान व शिष्ट दर्जाचा उर्दू शायर होता. याला उर्दूमध्ये 'इज्तमा ए जिद्देन म्हणतात. म्हणजे दोन विरुद्ध गोष्टींचा संगम. उदा.तलवारबाजी करणे आणि शायरी करणे. पहिल्यामध्ये कठोर हृदय लागते तर दुसर्‍यामध्ये हळूवार मन. हा चमत्कार बहादूरशहाने करून दाखविला. बहादूरशहा जफरचे पूर्ण नाव मुहम्मद सिराजुद्दीन बहादूरशहा होते व जफर हे त्यांचे टोपण नाव होते. दुसर्‍या अकबर बादशहाच्या लालबाई या हिंदू बेगमच्या पोटी जफरचा जन्म २४ ऑगस्ट १७७५ मध्ये झाला. लाल किल्ल्यात वाढलेला राजपुत्र पुढे जौक देहलवी या शायराच्या सान्निध्यात आला आणि गझल लिहायला लागला. जॉक राजदरबारातील उस्ताद शायर झाले आणि जफरची शायरी बहरास आली. परंतु म्हटल्याप्रमाणे कदाचित कुठल्याही उत्कृष्ट साहित्याची निर्मिती दु:खात विपन्नावस्थेत, संकटातच होत असावी. बहादूरशहा जफर पुढे दिल्लीच्या तख्ताचे बादशहा झाले आणि ब्रिटीश राजवटीविरुद्ध १८५७ चे बंड सुरू झाले. संपूर्ण भारत पेटून उठला. इंग्रजही तेवढय़ाच ताकदीने बंड चिरडण्याचा प्रयत्न करीत होते. बहादूरशहा जफरसुध्दा बंड करणार्‍या सैन्याचे नेतृत्व करीत होते. इंग्रजांनी बंड मोडून काढले. बहादूरशाहाला अटक झाली. पत्नी मुलांचा शिरच्छेद झाला आणि राजकैदी बहादूरशाहा जफरला ब्रम्हदेशातील रंगून येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आणि निराशेत, वियोगात, दु:खात बहादूरशाहाच्या हृदयातून ही सर्वकालीन गाजलेली महान, प्रसिद्ध गझल बाहेर पडली.

न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ
जो किसी के काम ना आ सके, मै वह एक मुश्ते- ए-गुबार हूँ।।
मेरा रंगरूप उजड गया, मेरा यार मुझसे बिछड गया,
जो चमन खिजा से उजड गया, मै उसकी फसले बहार हूँ।।
प-ए-फातेहा कोई आये क्यूँ , कोई चार फूल चढाये क्यूँ
कोई आके शम्मा जलाये क्यूँ , मै वह बेकसी की मजार हूँ।।

तिसर्‍या शेरामध्ये बादशहा म्हणतो, माझ्या कबरेवर प्रार्थना करायला कुणी यावं, चार फुले कुणी का वहावी, कुणी मेणबत्ती का पेटवावी? मी तर दु:खाचे मूर्तिमंत प्रतीक असलेले समाधीस्थळ आहे. अशा निराशा अवस्थेत बादशहा रंगूनमध्ये दिवस काढत होता. मनामध्ये हिंदुस्थानात जाण्याची ओढ आहे. आपला मृत्यूतरी मायभूमीत व्हावा, ही शेवटची इच्छा गझलमध्येच बादशहाने व्यक्त केली.

लगता नही है दिल मेरा उजडे दयार मे
किसकी बनी है आलमे ना पाईदार में।।
उम्रे दराज मांगकर लाये थे चार दिन
दो आरजू में कट गये, दो इन्तेजार में।।

पहिल्या शेरामध्ये तो म्हणतो, या विरान जागेत माझे मन लागत नाही. हे विश्‍व नाशिवंत आहे. यात कुणाचे बरे झाले म्हणून माझे बरे होणार?दुसर्‍या शेरामध्ये तो म्हणतो, परमेश्‍वराने चार दिवसांचे आयुष्य दिले. त्यातही दोन इच्छा व्यक्त करण्यात गेले अन् दोन वाट पाहण्यात गेले. परंतु शेवटचा शेर त्याचे सर्वात मोठे दु:ख व्यक्त करतो.

कितना है बदनसीब जफर दफन के लिए
दो गज जमीन भी न मिली कू-ए-यार में।

जफर किती दुर्दैवी आहे की, मला पुरण्यासाठी माझ्या प्रियेच्या अंगणात (कु-ए-यार) मध्ये म्हणजे हिंदुस्थानात थोडीशी जागाही मिळू नये.
हेच दु:ख उराशी घेऊन मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशहा रंगूनमध्येच तुरुंगात १८६२ मध्ये वारला. त्याच्या गझलांची संख्या फार नसली तरी कुल्लीयाते जफरमध्ये २00 गजल असतील आणि त्यामध्ये मानवी दु:ख, विरह, वेदना यांचेच वर्णन आहे.
मुघल साम्राज्याच्या या शेवटच्या बादशाहाची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी सध्याचे उर्दूचे सर्वात मोठे शायर मजफ्फर हनफी यांनी भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना पत्र लिहिले आहे की, रंगूनहून बादशहाची कब्र काढून तिला दिल्लीच्या लाल किल्ल्यातील एका ठिकाणी दफन करावे अन् त्यांची इच्छा पूर्ण करावी आणि त्यावर शेर लिहावा
कितना है खुश नसीब जफर दफन के लिए

दो गज जमीन तो मिली कू-ए-यार में।।

बघू या काय होते, अलविदा!
मो. ९८५0१३५४0५

तुझे ऐ जिन्दगी हम दूर से पहचान लेते है : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'

प्रिय रसिक,

मानवी समाजाच्या इतिहासात व मानवी संस्कृतीच्या उत्थानात एकाच उदात्त ध्येयासाठी संपूर्ण मानवजात एकत्र झाल्याची उदाहरणे फार कमी आहेत. कधी धर्माच्या, कधी जातीच्या, कधी वंशाच्या तर कधी प्रांत आणि देशाच्या नावांवर माणसं वाटली गेली, विभागली गेली, मारली गेली, हे सर्वo्रुत आहेच. त्याला भाषाही अपवाद नाही. आपल्या स्वार्थासाठी उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे, असा खोडसाळ प्रचार मुद्दाम करण्यात आला. परंतु संस्कृत आणि उर्दू हय़ा दोन प्राचीनतम भारतीय भाषा आहेत. हे जाणकारांच्या, साहित्यिकांच्या लक्षात आले. उर्दू गझलची नजाकत, सौंदर्य, शब्दभंडार जाणकारांच्या नजरेतून सुटले नव्हते. त्यामुळेच मुस्लीम शायरांसोबत गैर मुस्लीम शायरांनीही आपल्या भावभावना उर्दू गझलमध्ये व्यक्त करण्यास सुरुवात केली. हे करतानाच त्यांनी आपला धर्म, आपली संस्कृती याचेही भान आणि जाण गझलमध्ये व्यक्त केली आहे. येथे हे नमूद करणे अत्यंत आवश्यक वाटते की उर्दू भाषेच्या शब्द सौंदर्यावर, तिच्या प्रगल्भतेवर मुस्लीम आणि हिंदू शायरच नव्हे तर सर्व सृजनकार आपले मतभेद विसरून एकत्र होताना दिसतात. या हिंदू शायरांची यादी फार मोठी नसली तरी त्या काळात त्यांच्या गझलेने उर्दू साहित्यात मोलाची भर टाकली.
पंडित ब्रीजनारायण 'चकबस्त' कुंवर महेंद्रसिंह बेदी सहर, रामप्रसाद बिस्मील, बालकवी बैरागी, रघुपती सहायं फिराक, नरेशकुमार शाद, प्रो. जगन्नाथ आझाद ही स्वांतत्र्यपूर्व काळातील शायरांची यादी. स्वातंत्र्यानंतर यात भर पडली. राजेंद्रनाथ 'रहबर', अशोक साहिल, दिनेश दर्पण, देवेंद्र काफीर, उद्धव महाजन 'बिस्मील', लता हया, प्रीती बाजपायी, अतुल अजनबी आणि खाकसार डॉ. गणेश गायकवाड आगाज ही मंडळी सध्या उर्दू गझलमध्ये रंग भरीत आहे.
परंतु उर्दू गझल सर्वात सुंदर, जास्त लोकाभिमुख, जास्त नाजुक करण्याचा मान जातो प्रख्यात शायर फिराक गोखपुरी यांना 'महाकवी' या नामाभिधानाने गौरवित, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त शायर फिराक गोरखपुरी यांना गालिब आणि इकबालनंतर सर्वात जास्त प्रतिष्ठा लाभली. 'फिराक'ची शायरी म्हणजे हिंदू मायथौलॉजी, भारतीय संस्कृती, अध्यात्म यांचा सुरेख संगम ते लिहितात.


गझल है या कोई देवी खडी है लट छिटकाये
ये किसने गेसू ये उर्दू को यूँ संवारा है।।
हर एक ऑख के आंसू है अपनी पलको में
हर एक सीने में जो दर्द है हमारा है।।
(१ उर्दूचा केशसंभार)

फिराक गोरखपुरी यांचे संपूर्णनाव रघुपती सहाय हे होते. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे १८९६ मध्ये झाला. 'फिराक' हे त्यांचे टोपण नाव आणि ज्या शहरातून ते आले. गोरखपूर म्हणून फिराक गोरखपुरी. फिराक उच्च विद्याविभूषित व संस्कृतचे प्रकांड पंडित होते. परंतु त्याच सोबत उर्दू, फारसी भाषेचाही अभ्यास केला. त्याच वेळेस त्यांना प्रख्यात साहित्यिकार मुंशी प्रेमचंद यांचे सान्निध्य लाभले. त्याच सोबत एच जी वेल्स, बर्नार्डशॉ, रोमारोला या पाश्‍चात्य लेखकांचे वाचन सुरूच होते आणि मग गझल लेखन सुरू झाले. त्यांच्या शायरीमध्ये वैश्‍विक अनुभूती आली.

बहुत पहले से इन कदमो की आहट जान लेते है
तुझे ऐ जिन्दगी हम दूर से पहचान लेते है।।

जिसे कहती है दुनिया कामयाबी, पता है हमको
उन्हे किन किमतों पर कामयाब इनसान लेते है।।

तबीयत अपनी घबराती है जब सुनसान रातों मे
हम ऐसे में तेरे यादो की चादर तान लेते है।।

तुझे घाटा न होने देंगे कारोंबारे उल्फत में
हम अपने सर तेरा ऐ दोस्त हर नुकसान लेते है।।

फिराक यांच्या शायरीमध्ये रिवायती किवा परंपरागत फॉर्मचा वापर करूनसुद्धा भारतीय मातीचा सुगंध, भारतीय संस्कृती याचा पुरेपूर परिचय येतो. १९७१ मध्ये जेव्हा फिराक यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला. त्यावेळी प्रख्यात समीक्षक रमेशचंद द्विवेदी म्हणतात, भारतीय संस्कृती करुणा, विरह, वेदना यांचा संगम म्हणजे फिराकची शायरी.
फिराक म्हणतात.


'किसी का यूँ तो हुआ कौन उम्रभर भी
ये हुस्नो इश्क तो धोका है सब मगर फिर भी
हजार बार जमाना इधर से गुजरा है
नई नई सी है कुछ तेरी रह गुजर फिर भी ।।

मानवी जीवनाची क्षणभंगुरता, विफलता, आनंद-दु:ख या सर्व भावना फिराकच्या गझलमध्ये वाचावयास मिळतात.


सितारो सें उलझलाता जा रहा हूँ
शबे फुर्कत १ बहुत घबरा रहा हूँ।

तेरे गम से दिल बहला रहा हूँ
जहाँ को भी समझता जा रहा हूँ।

जो उलझी थी कभी आदम के हाथो
वो गुत्थी आजतक सुलझा रहा हूँ।

मूहब्बत अब मुहब्बत हो चली है
तुझे कुछ भूल ता सा जा रहा हूँ।

भारतीय काव्यजीवनाला नवी चेतना देणारा शायर, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आवडता शायर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त शायर, असे अनेक सन्मान मिळवणार्‍या या शायराचे सर्वात मोठे योगदान हे आहे की त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही .

के आती है उर्दू जबाँ आते आते : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'

प्रिय रसिक,

गझल का शेर बनता है, रुबाई याद आती है,
कभी तनहाई मे जब भी, तुम्हारी याद आती है।।
पुराने लफ्ज होकर भी, नये मानी १ निकलते है
तुम्हारे खत को पढकर जब पुरानी याद आती है।

(१-अर्थ)
ज्या काळात कविo्रेष्ठ गालिब आपल्या दारिद्रय़ाशी, दु:खाशी संघर्ष करीत उर्दू गझलमध्ये दर्शिनीकता, जीवनाचे सरळसाधे तत्त्वज्ञान मांडत होता त्याच काळात दिल्लीच्या लाल किल्ल्यात वास्तव्य करीत असणारा एक शायर आपल्या शाही, विलासी थाटाचा पुरेपुर उपभोग घेत उर्दू गझलमध्ये प्रेम, इश्क, सौंदर्य याचीच उधळण करीत होता. या शायराचे नाव होते 'दाग'. साधी सरळ योजना, मनाला भिडणारी, भावणारी शायरी हे दागचे वैशिष्ट्य.-
फिल में फरहत (खुशी) जो कभी आती है
अपने रोने पे हंसी आती है।।
क्या है गिनती मेरे अरमानों की

फौजकी फौज चली आती है।।
दाग यांचा जन्म दिल्लीच्या चांदणी चौक भागात २५ मे १८३१ ला झाला. दागचे पूर्ण नाव मिर्झा खाँ शमसुद्दीन खाँ. दाग ज्या वेळेस फक्त सहा वर्षांचा होता, त्यावेळी एका इंग्रज अधिकार्‍याची हत्या केल्याच्या आरोपाखाली दागच्या वडिलांना फाशीची शिक्षा झाली आणि 'दाग' पोरका झाला; परंतु दागची आई अतिशय सुंदर असल्यामुळे आखरी मुघल बादशाह बहादुर शाह जफरचा युवराज मिर्झा फखरू याने तिच्या सोबत 'निकाह' केला व आईसोबत दागही लाल किल्ल्यात आला आणि दागचे जीवनच बदलले. वयाच्या १५-१६ व्या वर्षीच महालातील शेरोशायरी, महफिलीत 'जौक' या उस्तादाच्या मार्गदर्शनाखाली दागच्या शायरीचा प्रवास सुरू झाला. ज्या व्यक्तीला, रोजी रोटी, दारिद्रय़, दु:ख या विवंचनाच नाहीत. ज्याने वयाच्या २५ व्या वषार्ंपर्यंत दु:ख पाहिले नाही, त्याची शायरी oुंगार, लावण्य, मादकता याचेच वर्णन करणारी होऊ घातली तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको आणि तसेच झाले. दाग अशा गझला लिहिण्यात निपून झाले.
बुताने माहवश १ उजडी हुई मंजिल मे रहते है
जिसी की जान लेते है, उसी के दिल में रहते है।।
हजारों हसरतें ऐसी, की रोके से नही रूकती
बहुत अरमान ऐसे है, की दिल के दिल में रहते है।।
कोई नामो निशा पुछे तो ऐ कासिद बता देना
तखल्लुस २ 'दाग' है और आशिको के दिलमे रहते है।।
(१ रूपवान सुंदर स्त्रियां) २ तखल्लुस-टोपणनाव.
दागच्या शायरीच्या प्रभावाखाली त्यांच्या शागिर्दांची फौजच्या फौज तयार झाली. नवाब साइल देहलवी, बेखुद देहलवी, आगा देहलवी, सीमाब अकबराबादी, साहिर होशियारपुरी; परंतु दागचा सर्वात प्रसिद्ध शिष्य (शागिर्द) म्हणून उदयास आले- 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा' लिहिणारे- डॉ.अल्लामा इकबाल. दागच्या प्रभावामुळे उर्दू जगत त्या काळी दोन भागात विभागले गेले- 'गालिब स्कूल' आणि 'दाग स्कूल' गालिबच्या प्रभावाखाली मानवी दु:ख, भावभावना, समाज हे शायरीचे विषय होते तर दागच्या गझलमध्ये हुस्न इश्क शबाब याचा उल्लेख असायचा; परंतु १८५७ चा उठाव झाला आणि इंग्रजांनी दागच्या वडिलांची म्हणजे बादशहाच्या पुत्राची हत्या केली आणि दागला लाल किल्ला सोडावा लागला. ऐशोआरामाचे दिवस गेले. मग रामपूर, लाहोर, अमृतसर, अजमेर, आग्रा असा प्रवास सुरू झाला आणि शेवटी दाग हैद्राबाद येथे आले व निजामाचे उस्ताद म्हणून स्थिरावले. त्या काळात गझल लेखन सुरूच होते. तेथेच १९0५ मध्ये हा शायर इहलोक सोडून गेला आणि आपल्या मागे सोडून गेला आपल्या सौंदर्यप्रचुर, साध्या-सरळ गझलाचे एक महाविश्‍व. दाग आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय शायर होते आणि सर्वात o्रीमंतही.
उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळविणे कठीण आणि त्यात शायरी करणे आणखीच धीराचे, संयमाचे काम. म्हणूनच दाग लिहितात.
'सुनाने के काबिल जो थी बात उनको
वही रह गई दर मिया आते आते
नही है खेल ऐ 'दाग' यारो से कहदो

के आती है उर्दू जुबा आते आते।।

..हम भूल गये हो तुझे ऐसा भी नही : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'

प्रिय रसिक,

एक मुद्दत से तेरी याद भी ना आई हमे
और हम भूल गये हो तुझे ऐसा भी नही


गझल उर्दू, हिन्दी, मराठी भाषेतील एक लोकप्रिय काव्यप्रकार. गझल पार्शियन व अरबी भाषेतून उर्दूमध्ये आली. 'गझल' चा अर्थ होतो - स्त्री वा स्त्रीच्या सौंदर्याविषयी चर्चा करणे. प्रख्यात शायर फिराक गोरखपुरी म्हणतात, 'एखादा निर्दय शिकारी आपल्या शिकारी कुत्र्यासोबत एखाद्या हरणाचा पाठलाग करत असताना, पळता पळता ते हरिण एखाद्या झाडामध्ये कुंपनामध्ये फसते त्याच वेळी शिकार्‍याचा बान त्याचा वेध घेते आणि त्याच कंठातून जो करूण स्वर बाहेर पडतो तो म्हणजे गझल' म्हणजे स्त्री ही कारुण्याचं, प्रेमाचं प्रतीक; तशीच गझल.
गझलचा हा रोमहर्षक इतिहास आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला जाणवतो उर्दू गझल लोकप्रिय होण्यामागे तिची 'नजाकत'. त्या भाषेतील मार्दव आपल्याला मोहीत करते.

'हुजुर मै आपके दौलतकदेपे (घरी)

हाजिर हो जाऊंगा'
आप कब मेरे गरिब खाने पे

तशरिफ ला रहे हो?

घर या एकाच वास्तूला उर्दूमध्ये दोन वेगवेगळे विशेषणांनी संबोधल्यामुळे त्याची नजाकत आणखीच वाढते. अमीर खुसरो (१२५0-१३२५ इ.) या कविला उर्दू शायरीचा जनक मानतात.

त्याच्या आधी हिन्दी कवी संस्कृत, पाकृत बनभाषेत काव्यरचना करायचे. खुसरोंचे स्वागत कबीर, जायसी ग्रहिम यांनी मन:पूर्वक केले. मात्र, जवळजवळ ४00वर्षांनी वलीदकनी या कवीने अरेबिक आणि पर्शियन यांच्या भाषास मुलामा लावून 'रेख्ता' ही भाषा आणली. तिलाच आपण उर्दू म्हणतो.

ही भाषा साफसुदरी असल्यामुळे वलीची शायरी लोकप्रिय झाली; परंतु उर्दूचा पहिला 'साहेब-ए-दिवान' (त्याचे उर्दू भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले आहे.) शायर होण्याचा मान जातो हैद्राबादचा कुली कुतबशाह.
परंतु उर्दू भाषेच्या सुवर्ण काळाचा शायर होण्याचा मान जातो दोन प्रमुख शायर मीर तकी मीर आणि सौदा.
परंतु मीर तकी 'मीर' हा या काळातील लब्ध प्रतिष्ठित शायर -
मीरचा कालखंड १७२२ ते १८१0 (लखनौ) येथे मीरच्या १८३९ गझला किमान १४ हजार शेर वास्तव्य प्रसिद्ध आहेत. १३ पुस्तके १0३ रुबाईया (कसीदे) असा भरपूर काव्यप्रपंच मीर तकी मीरने आपल्या आयुष्यात केला. 'मीर' हा त्याचा तखलुस (टोपननाव) त्याचा अर्थ होतो लिडर - नेतृत्व करणारा.
मीरची शायरी आपल्या कालखंडामध्ये उर्दू गझलचे नेतृत्व करणारी होती. म्हणूनच त्यांच्याविषयी डॉ.उर्मीलेश म्हणतात,

हमपर गम का परबत टूटा

तब हमने दो चार कहे
उस पर भला क्या बिती होगी,

जिसने शेर हजार कहे

दिल आणि दिल्ली र्मसिया (शोकगीत गाणारा) मीर त्यामुळेच उर्दू शायरीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जातो.

देख तो दिल की जाँ से उठता है
ये दुआँ तो कहाँ से उठता है


मीरची सर्वकालीक श्रेष्ठ गझल ज्यामुळे लोक 'मीरला' 'मीर' म्हणून ओळखायला लागले ती गझल आहे.

हस्ती अपनी हुबाब कीसी है
ये नुमाइश सराबकी सी है ।।
नाजुकी उसके लब की क्या कहि ये
पंखुडी इक गुलाब की सी है ।।
मै जो बोला कहा की ये आवाज
उसी खाना खराब की सी है ।।
बार बार उसके दर पे जाता हुँ
हालत अब इज्तीराब किसी है
'मीर' उन नीम बाज आंखोमे
सारी मस्ती शराब किसी है।।

गझलचा प्रत्येक शेर ही जणू स्वतंत्र कविताच असते. पहिल्या शेरमध्ये मीर म्हणतो,
माझे जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आणि माझ्या भोवतालचे वातावरण मृगजळासारखे आहे.
मधले दोन शेर समजायला अगदी सोपे असले तरी सोप्या भाषेमध्ये ही नजाकत उर्दूमध्ये मांडणे हीच मीरची कमाल होती. चवथ्या शेरामध्ये इज्तीराब म्हणजे व्याकुळता आहे.
'कि सी है' ही रदीफ आहे. प्रत्येक गझलमध्ये रदीफ एकच असतो. तो कधीच बदलत नसतो. रदीफ हा आरेबीक शब्द आहे. त्याचआधी घोडा किंवा उंटावर आरुढ झालेल्या स्वारामागे बसलेली व्यक्ती अथवा काफीया नंतर येणारा शब्द म्हणजे रदीफ.
या गझलमध्ये हुबाब, शराब, शबाब, इज्तिराब हे काफीये आहेत. काफीया म्हणजे पुन्हा पुन्हा येणारा शब्द यात जाचा स्वर कायम असतो.
या गझलविषयी भाष्य करताना प्रख्यात उर्दू समीक्षक डॉ.महेबुब राही म्हणतात, मीरनंतर 'कि सी है' रदीफ वापरुन कुठल्याही शायराला अशी गझल लिहिता आली नाही. इतकी ही गझल अप्रतिम आहे. म्हणूनच कवि श्रेष्ठ गालिब म्हणतो,

'रेख्ता के (उर्दू के) तुमही उस्ताद नही हो

गालीब कहते है
अगले जमाने मे कोइ मीर भी था ।।


पुछते है वो गालिब कौन है? : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'

मैला तन तो धोया जाये, मैले मन को धोए कौन?
हँसता है जो सबके दु:खमे, उसके दु:खमे रोए कौन?
नरम मुलायम है बिस्तर पर नींद जरा भी आयेना
पत्थर को सिर्‍हाने लेकर, गहरी नींद मे सोए कौन?
सब मुझको अपने लगते है, सब मुझको अच्छे लगते है
मै भी सोचू मेरी नींद में ऐसे सपने बोए कौन?
ही दुसर्‍याचे दु:ख आपले समजून, तिला आपला शब्द देण्याची भावना - ही परपीडेची अनुभूती चांगला शायर, कवी होण्याची पहिली खूणगाठ आणि चांगला माणूस होण्याचीसुद्धा. आज आपण चर्चा करणार आहोत उर्दूमधील अशाच परदु:खाला आपले समजून त्याला शब्द देणार्‍या उर्दूमधील सर्वकालिक महान शायराविषयी. ज्याला उर्दू दुनिया 'गालिब' या नावाने ओळखते. 'गालिब'चे पूर्ण नाव मिर्झा असदुलाखॉं गालिब. 'गालिब' हा त्याचा तखलुस टोपणनाव म्हणजे 'विजेता'. आपल्या शायरीने सर्वांचे हृदय, अगदी वयाच्या २५ व्या वर्षीच जिंकणार्‍या या शायराचा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दु:खाशी, दारिद्रय़ाशी संघर्ष आयुष्यभर सुरू होता.

'पुछते है वो गालिब कौन है?
कोई बतलाये के हम बतलाये क्या?'

इतका स्वत:विषयीचा सार्थ अभिमान बाळगणारा शायर गालिबने उर्दू शायरीला 'मीरच्या' 'हुस्न इश्क'च्या प्रभावातून बाहेर काढले. जीवनाचे तत्त्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेत गालिबने जगापुढे मांडले. गालिब फार मोठा तत्त्ववेत्ता नसला, तरी तो एक सजग माणूस होता. जीवनातील घडणार्‍या घटनांना केवळ मूकदर्शक बनून न पाहता त्यांना आपल्या भाषेत त्याने व्यक्त केले.



कोई उम्मीद बर नही आती
कोई सुरत नजर नही आती।।
मौत का एकदिन मुअय्यन१ है

नींद क्यू रातभर नही आती।।
आगे आती थी हाले दिलपे हंसी
अब किसी बातपर नही आती।।
काबा किस मुँहसे जाओंगे गालिब
शर्म तुमको मगर नही आती।।
(१-नक्की)
गालिबचे पूर्ण आयुष्य क्रांतिकारी विचारांचे. तो निधर्मी वृत्तीचा होता. पूजा, कर्मकांड, प्रार्थना, नमाज यावर त्याचा विश्‍वास नव्हता आणि म्हणूनच तो कदाचित म्हणत असावा.
'काबा किस मुँह से जाओंगे गालिब?'
गालिबच्या कर्जबाजारीपणामुळे दिल्लीच्या एका पडक्या कोठीत गालिबचे वास्तव्य. त्याचे वर्णन वाचताना जाणवते. सायंकाळची वेळ. सूर्य अस्ताला गेला आणि गझलेच्या या सूर्याचा उदय झाला. अंधार हळूहळू या छोट्याशा घरात आपले हातपाय पसरवित आहे आणि एक छोटीशी मेणबत्ती आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने त्या अंधाराचा मुकाबला करीत आहे. मध्येच बकर्‍यांचा ओरडण्याचा आवाज येतो आहे आणि त्या सोबतच येतो आवाज- वाह वाहचा- गझल सुरू आहे.
'हरेक बात पे कहते हो तुम, के तु क्या है
तुम्ही कहो कि ये अन्दाजे गुफ्तगू क्या है?
रंगोमें दोडते फिरने के हम नही कायल
जब आँखही से न टपके, तो फिर लहू क्या है?'

माझ्याशी प्रत्येक वेळेस बोलताना तू म्हणतोस तू काय आहेस? तुझी बिशाद काय? मित्रा मला सांग की संवाद साधण्याची ही कुठली तर्‍हा आहे? दुसरा शेर गालिबचे स्वभाव वैशिष्ट्ये सांगणारा आहे. गालिबच्या काळात ब्रिटीशांची जुलमी राजवट सुरू झाली होती आणि त्या काळातच गालिब लिहितो 'केवळ धमण्यातून जे वाहतं त्याला आम्ही रक्त म्हणत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी जर हे रक्त तुमच्या डोळ्यातून अंगार म्हणून बरसणार नसेल त्याला रक्त का म्हणावं?
गालिब त्याच्या शायरीमुळे अल्पावधीत संपूर्ण उर्दू विश्‍वामध्ये प्रसिद्ध झाला. परंतु येथे नमूद करण्यासारखे आहे की, त्याच्या एकूणच उर्दू गझल २३५ च्या आसपास असतील. त्या गझलच्या लोकप्रियतेवरच गालिब गझल सम्राट झाले. गालिबच्या गझलांचा प्रवास जीवनाच्या अखेरपर्यंत सुरूच होता. त्यासोबतच सुरू होता त्या परिस्थितीशी संघर्ष तो म्हणतो.

इब्ने मरियम हुआ करे कोई
मेरे दुख की दवा करे कोई।।

येशू ख्रिस्ताने ज्याला रोगमुक्त करायचे ते खुशाल करावे परंतु माझा रोग जो कुणी दूर करेल तोच माझ्यासाठी o्रेष्ठ आहे.

न सुनो गर बुरा कहे कोई
न करो गर बुरा करे कोई।।
रोकलो गर गलत चले कोई
बख्श तो गर खता करे कोई।।
जीवनाचे तत्त्वज्ञान अशा सोप्या भाषेत मांडणारा गालिब म्हणून आपल्या समकालीन शायर दाग, मोमिन, जॉक यांच्या तुलनेत वेगळा ठरला आणि त्याची शायरी लोकांना खूप आवडली. हुस्न, इश्क या पेक्षाही गालिबने उत्कटता, मानवी नाते संबंध, मानवी स्वार्थ, दु:ख, नैराश्य यांनाच गझलेचे विषय केले. सर्व असूनही मानवी जीव अतृप्त कसे यावर त्याचे हे अप्रतिम शेर.
'हजारो रब्बाहिशें ऐसी की हर रब्याहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकीन फिर भी कम निकले।।
मुहब्बत मे नही है फर्क जीने और मरने का

उसीको देखकर जीते है जिस काफिर पे दम निकले।।
कहॉ मयखाने का दरवाजा गालिब और कहाँ वाईज
पर इतना जानते है, कल वो आता था की हम निकले।।